प्राचार्य शिवाजीराव बागल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार..

प्राचार्य शिवाजीराव बागल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार..

-------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे ग्रामीण साहित्य घरोघरी पोहोचले आणि ज्यांच्या मराठी साहित्याचा लौकिक महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर झाला, असे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या 'अनंताचे प्रवासी ‘ या कादंबरीला स्वदेशी भारत सन्मान हा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. आसू ता.फलटण जि.सातारा येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी बुधवारी स्वदेशी भारत साहित्य संमेलनामध्ये   प्राचार्य शिवाजीराव बागल यांना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात येणार आहे.

            प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या साहित्याला यापूर्वी विविध ठिकाणचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेल असून प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या कादंबरीस हा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.